५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

१२/१२/१२ च्या मुहुर्तावर १२ वाजुन १२ मिनिट १२ सेकंदानी


मंडळी आज ११.११.११ तारीख,...सकाळ पासून तुमच्या आयुष्यात येणारी तारीख,परत हा दिवस येणार नाही.काहीतरी आठवणीत राहिल असे करा असे संदेश मोबाईल वर येवून गेले, तर काही जणांनी ११-११-११ च्या ११ वाजुन ११ मिनिटांसाठी शुभेच्छा देवू केल्या.मिडियावाल्यानी तर लग्नाची घाई पासून जुळ्यांचा जन्म या पर्यंत बातम्यावर चर्चा केली.अभ्यासकांनी तर या दिवसाची कोणतीही वेळ शुभ नाही असे मत नोंदवूनही टाकले.

मग मनात विचार आला की खरच एखादे विशेष कार्य करण्य़ासाठी तारीख,वेळ महत्त्वाची मानायची का?
तसे असेल तर आज एखाद्या मुलीला मागणी घालणार्‍या मुलाला,जर तिने होकार दिला तर त्याच्या साठी तो शुभ मुहुर्त मानावा लागेल..आणि नकार दिला तर त्याच्या तो कायम लक्षात राहणार कारण ११.११.११,अभ्यासक म्हणतील दिवस शुभ नव्हता रे बाबा.

मग शेवटी ठरले की११.११.११ आले,आता पुढील वर्षी १२.१२.१२ च्या मुहुर्ताला १२ वाजुन १२ मिनिट १२ सेकंदाना काय करायचे ते ठरवून ठेवावे लागेल :D
मिडियावाल्यानी आतापासुन बातमी तयार करून ठेवावी..म्हणजे तो संपुर्ण दिवस त्या बातमीवर काढता येईल. उदा. १२.१२.१२ च्या मुहुर्ताचे औचित्य साधून," मला जावू द्याना घरी आता वाजले की १२." हे गाणे १२ वाजता वाजवण्यात आले.

माझ्या मित्राने तर १२ महिने में १२ तरिकेसे या गाण्यावर नाचू या असे ठरवून ही टाकले.

शेवटी तारीख,महिनी,वर्षे ,वेळ कोणतीही असो ती आठवणीत राहावी असे कार्य करणे आपल्या हातात असते...त्यासाठी अश्या विशेष मुहुर्तांची गरज नसावी, नाही का? :-)
धिंकचिका धिंकचिका धिंकचिका धिंकचिका

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment