या आधीच्या लेखात मी रेडीच्या यशवंत गड किल्ल्याची माहिती देवून मी काढलेली छायाचित्रे दाखविली होती.
आज तेरेखोलचा किल्लाची थोडक्यात माहिती आणी मी काढलेली छायाचित्रे इथे दाखवण्याचा माझा एक प्रयत्न आहे.
थोडक्यात माहिती:
माझे गाव गोवा आणी महाराष्ट्राच्या सीमेवरच आहे.त्यामुळे २०-२५ मिनिटांच्या कालावधी मध्ये सहज गोव्यातील तेरेखोल मध्ये प्रवेश करता येतो. गोवा सरकारने त्यांच्या किल्यांची खूप चांगली काळजी घेतलेली आहे...त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारचे धोरण अगदी उदासीन आहे.त्या बद्दल न बोललेले बरे..तुम्ही जर यशवंत गड किल्याची छायाचित्र पाहिलेत आणी त्यानंतर तेरेखोल किल्याची छायाचित्र पाहिलीत तर तुम्हाला हा फरक सहज लक्ष्यात येईल.आपल्या इथे किल्ल्यांची खुपच दुरावस्था केली जाते.कुठे तरी हे थांबायला हवे.
तर असा हा तेरेखोलाचा किल्ला खरतर सावंतवाडीच्या खेमसावंतांनी बांधला होता...पण १७४६ मध्ये पोर्तुगिजांना तो जिंकून घेतला. काही काळ मराठ्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता पण परत तो पोर्तुगिजांनी जिंकला. गोवा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्यांच्या आठवणी या किल्याशी जोडलेल्या आहेत.
१९६१ मध्ये गोवा मुक्त झाल्यावर गोवा सरकारने ९ डिसेंबर १९७६ ला किल्याचे हॉटेल मध्ये रुपांतर केले. पण राहण्याची सुविधा महागडी आहे. रेडीचा यशवंत गड आणी तेरेखोलाचा किल्ला यात केवळ ७ किलोमीटरच्या आसपास अंतर असल्यामुळे एकाच दिवसात तुम्ही रेडीचा स्वयंभू गणपती,समुद्र किनारा.खाणी,तेरेखोलाचा किल्ला पाहू शकता.
खाली दिलेल्या चित्रसंचायीकेमध्ये या किल्याची छायाचित्रे तुम्हाला पहायला मिळतील.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
थोडक्यात माहिती:
माझे गाव गोवा आणी महाराष्ट्राच्या सीमेवरच आहे.त्यामुळे २०-२५ मिनिटांच्या कालावधी मध्ये सहज गोव्यातील तेरेखोल मध्ये प्रवेश करता येतो. गोवा सरकारने त्यांच्या किल्यांची खूप चांगली काळजी घेतलेली आहे...त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारचे धोरण अगदी उदासीन आहे.त्या बद्दल न बोललेले बरे..तुम्ही जर यशवंत गड किल्याची छायाचित्र पाहिलेत आणी त्यानंतर तेरेखोल किल्याची छायाचित्र पाहिलीत तर तुम्हाला हा फरक सहज लक्ष्यात येईल.आपल्या इथे किल्ल्यांची खुपच दुरावस्था केली जाते.कुठे तरी हे थांबायला हवे.
तर असा हा तेरेखोलाचा किल्ला खरतर सावंतवाडीच्या खेमसावंतांनी बांधला होता...पण १७४६ मध्ये पोर्तुगिजांना तो जिंकून घेतला. काही काळ मराठ्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता पण परत तो पोर्तुगिजांनी जिंकला. गोवा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्यांच्या आठवणी या किल्याशी जोडलेल्या आहेत.
१९६१ मध्ये गोवा मुक्त झाल्यावर गोवा सरकारने ९ डिसेंबर १९७६ ला किल्याचे हॉटेल मध्ये रुपांतर केले. पण राहण्याची सुविधा महागडी आहे. रेडीचा यशवंत गड आणी तेरेखोलाचा किल्ला यात केवळ ७ किलोमीटरच्या आसपास अंतर असल्यामुळे एकाच दिवसात तुम्ही रेडीचा स्वयंभू गणपती,समुद्र किनारा.खाणी,तेरेखोलाचा किल्ला पाहू शकता.
खाली दिलेल्या चित्रसंचायीकेमध्ये या किल्याची छायाचित्रे तुम्हाला पहायला मिळतील.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment