५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

मी ब्लॉगवर राजकीय विषयावर लिखाण का करत नाही?


मित्रमंडळी,
                 बरेच जन मला विचारत होते आणि विचारतात की तुम्ही ब्लॉग वर राजकीय विषयाशी निगडीत लिखाण का करत नाही?त्याच उत्तर थोडक्यात देण्याचा आज मी प्रयत्न करतो आहे.
मी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.ब-याच गोष्टी,मग त्यात मी केलेले छायाचित्रण असो,कविता,चारोळ्यांचे लिखाण असो,बनवलेले युटूब व्हिडीओज् असोत,ऑडिओ असो अथवा शोर्ट फिल्म असो,तंत्रज्ञान,ब्लॉगिंग संबंधीचे लिखाण असो,हे सर्व मी स्वत: केलेले आहे. ,हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.हे  सर्व मित्रमंडळी आणि इतरां सोबत  या ब्लॉगच्या माध्यमातून हे सर्व शेअर केले आहे.
             राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत. जिथे शक्य असेल तिथे तिथे मी माझ मत स्पष्ट  शब्दात  मांडतो आणि त्या त्या व्यक्तीपर्यंत माझा आवाज पोहोचवतो.पण ब-याच वेळा होते काय?या चर्चामधून बाकी काही साध्य होतच नाही.नुसत्या चर्चा होतात आणि शेवटी सर्व शांत होते.दरवेळी सन्माननीय तोडगा सुचविण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे,पण ब-याच वेळा होते काय? दोन्ही कडचे समजून घेत नाहीत आणि शेवटी पटले तरी काही दिवसात विसरून जातात.
म्हणून म्हणतो,कृती महत्वाची,या चर्चांना काहीही अर्थ नाही.
उदा.मराठा आरक्षणावर जे राजकारण सुरु आहे,त्यावर न राहून मी दोन्ही कडच्याना सन्माननीय तोडगा सुचवला होता.त्याला ७४३लाईक्स आणि ३५२ रिप्लाय आले होते.दोन्ही कडच्यानी पसंती दर्शवली,मान्य केले अमान्य केले,पण शेवटी अश्या चर्चाचा उपयोग काय?जोपर्यंत माणसाची स्वत:हून स्वत:मध्ये बदल करायची तयारी नसते.म्हणून म्हणतो शेवटी कृती महत्वाची आणि याचसाठी  राजकीय विषयावर  ब्लॉगवर लिखाण करणे मी टाळतो आणि तेच लिहितो तंत्रद्याना संबंधी लिखाण करतो जे समाजाच्या आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडेल.मग जात,धर्म.पंथ कोणताही असो. :-)


धन्यवाद,
तुमचा मित्र
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment